शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस

शेवगाव प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे या मागणीसाठी शेवगाव शहरामध्ये मध्ये काल पासुन आमरण उपोषण सुरूआहे शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहरातील टपरीधारकांनी काल गुरुवार दि २७ वार गुरुवार पासून शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.शेवगाव मधील टपरी धारकांचा गेली 60 ते 70 वर्षाचा इतिहास असून टपरी धारकांची अतिक्रमण काढल्याने टपरीधारकावर उपासमारीची वेळ आली आहे. शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे कामगार सुद्धा हजारो बेरोजगार झालेले आहे. तसेच टपरी धारकाच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. टपरी धारकावर विविध बँकांचे कर्ज होम लोन इत्यादी व्यवसाय कर्ज काढलेले असल्याने त्यांच्यावर मार्च एन्ड मुळे बँकांकडून कर्जाचे तगादे सुरू झाले आहेत. त्यामुळे शहरातील महाराष्ट्रशासनाच्या मालकीचे ( “सध्या धनदांडग्यांची अतिक्रमण असलेले” )मोकळे भूखंड तात्काळ ताब्यात घेऊन टपरीधारकांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी आज हे उपोषण करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!