प्रदूषणाबाबत शेतकऱ्यांचे चौथ्या दिवशी आमरण उपोषणाला स्थगिती..

 

दौंड :- आलिम सय्यद,

गेल्या चार दिवसांपासून पांढरेवाडी गावातील कुलंगे कुटूंबाचं दौंड तहसील कार्यलयासमोर आमरण उपोषण चालू होतं कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रोजच्या होणाऱ्या प्रदूषणावरती उपोषण सुरू होत. मात्र चौथ्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना उशिरा जाग येऊन त्यांनी आज सायंकाळी उपोषण कर्त्यांना भेट दिली असता याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर चौथ्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगिती करण्यात आलं.अनेक वर्षांपासून कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अनेक कंपन्या कंपन्यांमधून निघणारे दूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जाते हेच दूषित रासायनिक सांडपाणी थेट पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने या होणाऱ्या नुकसानीची भरपाई या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. यावेळी शेतातील मातीचे नमुने, व पाण्याचे नामुन्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांना देऊन पुढील कारवाही होईल असं यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे. उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक नारायण पवार, यांनी यावेळी उपोषण कर्त्यांना लिंबू शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुर्यकांत शिंदे , एमआयडीसी अधिकारी विजय पेटकर, प्रशांत जोशी, नरसिंग थोरात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!