माहिती अधिकार कायदा 2005 याकडे दुर्लक्ष…

जव्हार
माहितीचा अधिकार
2005 या कायद्याच्या आधारावर अर्ज दिला तर जव्हार तालुक्यातील काही ग्रामपंचायतील ग्रामसेवक तसेच जव्हार नगर परिषद या ठिकाणचे माहिती अधिकारी माहिती देण्याचे काम करत नाही..
एखाद्या पत्रकाराने तसेच सामान्य माणसाने अर्ज केला तर त्याची दिशाभूल करायचा काम चालू आहे.. काही ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते ..
तसेच दिशाभूल करणारे उत्तर देण्याचे काम सुरू आहे,
सामान्य व्यक्तीला उडवा उडवीचे उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते.
पहिला अर्ज 30 दिवस तसेच पहिला अपील 45 दिवस अशाप्रकारे दोन ते चार महिने त्रास दिला जातो .. त्यानंतरही माहिती मिळणे कठीण झाले आहे..
दरम्यान झोलीत दिशाभूल करणारी उत्तरे ..
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा गैरवापर व उल्लंघन होत असेल तर जव्हार नगर परिषदेत तसेच काही ग्रामपंचायतीमध्ये याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे ..
दरम्यान या कायद्याच्या आधारावर सामान्य नागरिक आपला हक्क मागण्याचा काम करत असतो..
आता त्यालाही केराची टोपली दिली जात आहे..
दरम्यान या कायद्याचा योग्य वापर होत नसेल तर कायद्याचा काही अर्थ राहिलेला दिसून येत नाही..
दरम्यान आता जव्हार तालुक्यात गरीब सामान्य नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे की सरकारी दप्तरी आपला हक्क मागण्यासाठी काय करावे….. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!