भारत जोडो यात्रेसाठी कॅप्टन सत्यम भाई ठाकूर यांची निवड..

डहाणू –प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे

दिनांक सात सप्टेंबर पासून काँग्रेस नेते माननीय राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेची शुभारंभ होत आहे ह्या पद यात्रेचे अंतर 3570 किलोमीटर इतका असणार आहे ह्या यात्रेची सुरुवात कन्याकुमारी पासून सुरू होऊन ती थेट श्रीनगर पर्यंत चालणार आहे ह्या यात्रेच्या कालावधी 150 दिवस असणार आहे ह्या यात्रेची प्रमुख उद्दिष्टे आपल्या देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या प्रमुख मुद्द्यांवर होत आहे ह्या यात्रेसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी तर्फे आपल्या पालघर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी वानगाव चे सुपुत्र कॅप्टन सत्यम भाई ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे हे एक आपल्या पालघर जिल्ह्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे यामुळे आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!