पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी – कुणाल भावसार..

येवला- पोलिस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन येवला शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चे कुणाल भावसार यांनी महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्री यांना मेल पाठवले आहे व मागणी करण्यात आली आहे
पोलीस भरती प्रक्रिया ही उत्तम रित्या राबविली जात आहे परंतु सदर भरती साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर आहे
अर्ज करण्याकरिता तीन दिवस शिल्लक असून ग्रामीण भागातील अनेक युवक युवती भरती पासून वंचित राहू शकतात व ५ ते ६ दिवसा पासून नेटवर्क जाम असल्याकारणामुळे परत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जात नसून तरी त्या भरतीची मुदत अजून पंधरा ते वीस दिवस वाढवण्यात यावी व अनेक इच्छुक उमेदवारांना ,भरतीचा भाग घेऊ शकतात .
अर्ज भरण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्यात यावी असे मागणी येवला शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष व
शिवसेवा अकॅडमी चे संचालक कुणाल भावसार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!