उमापूर परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

उमापुर
प्रतिनिधी समीर सौदागर
आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या अवकाळी वादळ अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आलेले बाजरी, गहू,हरभरा, ज्वारी, भुईमूग,पूर्णपणे उध्वस्त करून टाकले प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने रस्त्याच्या कडेतील झाडे काही शेतकऱ्यांचे पत्रे व शेती साहित्य याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गावातील काही नागरिकांची घराची पडझड काहींचे पत्र काहींचे सामान व काही जणांचे कापूस पावसात भिजला असून मोठे नुकसान झाले आहे आधीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव नाही अशा शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे.शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात मोठ्या प्रमाणात सापडला आहे तरी प्रशासनाने झालेले नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!